पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे अहिंसा पुरस्कार जे शाकाहारी व्यक्तींना आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या महानुभावांना दिले जातात .
यावर्षी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना अध्यात्मिक क्षेत्रातील, ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांना साहित्य क्षेत्रातील, तसेच श्री रघुनाथ ढोले यांना पर्यावरण क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्री शेखर सिंह जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.